विद्यापीठाच्या उन्हाळी 2020 अंतीम वर्षाच्या परीक्षा आता महाविद्यालयीन स्तरावर

– विद्यापीठ विद्या परिषदेचा महत्वपूर्ण निर्णय
अविनाश पोहरे – संपादक
अमरावती – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी 2020 अंतीम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय स्तरावर ऑनलाईन/ऑफलाईन व असाईनमेंट अशा पद्धतीने घेण्याचा निर्णय आज संपन्न झालेल्या विद्या परिषदेमध्ये एकमताने घेण्यात आला. कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाची विद्या परिषदेची सभा ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. या सभेमध्ये अंतीम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन (एम.सी.क्यु.) पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने संबंधित महाविद्यालयांना घ्यावयाची आहे. एम.सी.क्यु. पद्धतीने पेपर सुद्धा संबंधित महाविद्यालयांना सेट करावयाचे असून 40 प्रश्नांचा पेपर असेल, त्यापैकी 20 प्रश्न विद्याथ्र्याला सोडवावे लागतील. परीक्षा एक तासाची राहणार असून परीक्षेचा टाईम-टेबल संबंधित महाविद्यालय स्तरावर तयार होणार आहे. संबंधित महाविद्यालयाला उन्हाळी 2020 च्या सर्व अंतीम वर्षाच्या परीक्षा दि. 2 नोव्हेंबरपर्यंत घ्याव्या लागणार आहेत. सर्व संबंधित विद्याथ्र्यांना परीक्षेसंदर्भात आपल्या महाविद्यालयांशी संपर्क तातडीने साधावयाचा आहे.
परीक्षा झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयाला तातडीने विद्याथ्र्यांचे गुण विद्यापीठाला पाठवावे लागणार असून जास्तीतजास्त 5 ते 6 नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयांना गुण पाठविण्याची अंतीम तारीख असून, त्यानंतर 8 नोव्हेंबरपासून परीक्षांचे निकाल विद्यापीठाकडून जाहीर होतील. दि. 20 ऑक्टोबर, 2020 रोजी ऑनलाईन पद्धतीने ज्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या, त्या रद्य करण्याचा निर्णय सुद्धा आजच्या सभेत घेण्यात आला आहे.
अंतीम सत्राच्या विद्याथ्र्यांच्या अनुशेषाच्या परीक्षा असाईनमेन्ट पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. विद्याथ्र्यांनी संबंधित परीक्षेतील विषयाचे असाईनमेन्ट पूर्ण करून आपल्या महाविद्यालयाला विहित मुदतीत सादर करावयाचे असून महाविद्यालयांना विद्याथ्र्यांनी सादर केलेल्या असाईनमेन्टचे मूल्यांकन करून त्याचे गुण जास्तीतजास्त 5 नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठाला पाठवावयाचे आहेत.
शासनाचे निर्देश आणि गुणवत्ता ठेवून परीक्षा घेण्यात येणार असून त्या संदर्भातील सविस्तर निर्देश परीक्षा विभगाकडून संलग्नित महाविद्यालयांना तातडीने पाठविले जाणार आहे. सर्व महाविद्यालयांचे सहकार्य यासाठी निश्चितपणे मिळणार, असा विश्वास कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी व्यक्त करुन विद्याथ्र्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्याथ्र्यांना जो मनस्ताप झाला त्याबद्दल सुद्धा कुलगुरूंनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे.
विद्यापरिषदेला सर्व सन्माननीय सभासद उपस्थित हाते व त्यांनी चर्चेमध्ये सहभाग घेवून महत्वपूर्ण विषयांवर आपले मत मांडलेत.