ताज्या घडामोडी

नवदुर्गा मोहत्सव व धम्मचक्र परिवर्तन दिन, ईद नियमांचे पालन करा पण कोरोना महामारीला गांभीर्याने घ्या -मोनिका राऊत उप अधीक्षक अकोला

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी

बाळापूर : नवदुर्गा मोहत्सव उत्सवाला व धम्मचक्र परिवर्तन दिन, ईद सुरुवात होणार असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकार विभागाने मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. त्याचे कटाक्षाने पालन सर्वांकडून झाले पाहिजे. हे उत्सव कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरे केले पाहिजे, तसेच कोरोना विषाणूला गांभीर्याने घ्या. दरवर्षी पेक्षा हे वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे साधे पणाने साजरे करा. असे आवाहन अकोला जिल्हा उप पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी केले. तालुका नियोजन समितीची शांतता समितीची बैठक नगर परिषद हॉल,जुनी चावडी, बाळापूर येथे दि. 8 ऑक्टोबर रोजी 1. 00 वा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर नवनियुक्त तहसीलदार डि.एल.मुकुंदे, वीज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता आशिष कलावटे,नगर परिषद मुख्याधिकारी गोपीचंद पवार,तसेच शांतता समितीचे अध्यक्षांसह  सदस्य मोठ्या संख्येने उपस्थि‍त होते.नवदुर्गा उत्सव मंडळानी कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर  सार्वजनिक नवदुर्गा मंडळात मध्ये वाद्य वाजवू नये. तसेच  शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे. नवदुर्गा विसर्जन कसे करावे, तसेच मुस्लिमांचा ईद देखील कसी साजरी करावी. त्यात नवदुर्गा देवीची ची स्थापना करावी.व विसर्जन कसे करावे असे सांगितले व शक्यतो उत्सवाचे स्वरूप खूप साधे ठेवावे, गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच मास्क लावणे, शारीरिक अंतर ठेवणे मंडळ सॅनिटाईजर करावे अशा बऱ्याच  नियमांचे पालणे करणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजे कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही. गर्दीची ठिकाणे टाळावीत. प्राधान्यक्रमाने कामाचे स्वरुप ठरवावे. अनावश्यक गर्दी होऊ देवू नये. कोणत्याही प्रकारचा नकारात्मक संदेश जनतेपर्यंत पोहोचणार नाही याविषयी पोलीस प्रशासनाने काळजी घ्यावी.जनतेनेही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.  संपूर्ण राज्यात कलम 144 लागू केलेले आहे. हे कलम आपल्या सर्वांच्या हितासाठीच आहे. शासन आणि प्रशासन याबाबतीत कमालीचे सतर्क असून जनतेने सर्व प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन करावे.अशी माहितीपोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांनी दिली.त्याच प्रमाणे तहसीलदार डि.एल.मुकुंदे, नगर परिषद मुख्याधिकारी गोपीचंद पवार, महावितरण चे उप कार्यकारी अभियंता आशिष कलावटे यांनी कोव्हीड-19 संदर्भात मार्गदर्शन केले. व कोरोना विषाणू अजून गेला नसून त्या पासून बचावा साठी खबरदारी घ्यावी.अशी अपेक्षा तहसीलदार यांनी व्यक्त केली.शांतता समिती सदस्यांच्या निर्णयांचे स्वागत केले.  याप्रसंगी जेष्ठ पत्रकार रमेश ठाकरे, महादेव शेलार, माजी नगरसेवक मोहम्मद अक्रम, तर माजी नगरसेवक उमेशआप्पा भुसारी यांनी वितरण कंपनीच्या वीज समस्या, नगर परिषदेच्या नाल्या सफाई, मुख्य मार्गावरील अतिक्रमण तसेच कॉटन मार्केट मध्ये उत्सव काळात व्यवस्था करावी. तसेच पत्रकार उत्तमराव दाभाडे यांनी प्रशासनाला बाळापूर शहरातील समस्या दूर करण्यास जनतेस मदत करावी. यावेळी शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. तसेच नवदुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी, ईद उत्सव साजरे करणारे मुस्लिम बांधव व धम्मचक्र पपरिवर्तन दिन साजरे करणारे बौद्ध बांधव तसेच पत्रकार व विविध पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुजित शाह तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांनी मानले. 

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: