चतारी शेत शिवारातील एका हेक्टर वरिल ज्वारी पिकांचे नुकसा रानडुकरांणी धिंगाणा शेतकरी त्रस्त, भरपाईची मागणी

नासिर शहा
प्रतिनिधी पिंपळ खुटा
वनपरिक्षेत्र आलेगाव विभागांतर्गत येत असलेले चतारी गाव असून या परिसरात बागायती तसेच कोरडवाहू शेतीचे प्रमाणाही जास्त आहे. तसेच ज्वारी,उळीद,मुग,तूर,सोयाबीन, कपाशी,या पिकाचा पेरा असून यामधील उळीद,मूंग या पिकावर अज्ञात रोगाणे साम्राज्य केले होते त्यामुळे हे दोन्ही पिक शेतकऱ्यांच्या पदरात पडते नाही. त्याचप्रमाणे आता ज्वारीचे पिक शेतकऱ्यांच्या पदरात पडताच रानडुरांनी परिसरात हैदोस घातल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते आहे.
मागील ज्यापेक्षा यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्यामुळे परिसरात सर्वच पिकांची पेरणी केली यामध्ये ज्वारीचे पिकही चांगलेच बहरले आहेत मात्र काही दिवसापासून रानडुकरे आणी रोहीच्या कळपांची हरणीची ही पिके फस्त केली आहेत.वन्य प्राण्यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात पडणारे ज्वारीचे पिकही वाया जाण्याच्या मार्गावर आहे.तसेच चतारी येथील शेतकरी मनोहर पुंडलिक हिरळकार त्यांच्या शेत सर्वे ५४ दोन शिवार चतारीमधील त्यांनी या वर्षी जवळपास एक हेक्टर मध्ये ज्वारी पिकाची पेरणी केली असता ज्वारी पिकही चांगलेच बहरले होते मात्र या एक -दोन दिवसात रानडुकर यांनी एकून एक हेक्टर मधील ज्वारी पिकाचा अनोनात नुकसान केले आहे त्यामुळे शेतकरी हा एक हेक्टर मधील ज्वारीचे पिक पदरात पडण्याची शक्यता नाही.त्यामुळे शेतकरी मनोहर पुंडलिक हिरळकार,यांचे एक हेक्टर ज्वारी पिकाचे नुकसान झाले असून भरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्याकडून होत आहे.तसेच या परिसरातील रानटी डुकरे तसेच आधी जंगली प्राणी यांचा पिकाना थांबवण्यासाठी वनपरिक्षेत्र आलेगाव विभाग यांनी काहीतरी उपाय योजना करून शेतकऱ्यांचे होणारे पिकांचे नुकसान थांबवावे अशी मागणी परिसरातील नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे.
माझ्या शेतातील एक हेक्टर ज्वारीच्या पिकांचे रानटी डुक्कर तसेच रोही हरीण यांनी धिंगाणा घालून पिकाचे अनोनात नुकसान केले आहे.त्यांमुळे शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी परिसरातील शेतकऱ्याची मागणी आहे.
मनोहर पुंडलिक हिरळकार
शेतकरी चतारी