तेल्हारा सात्काबाद येथील पाणी पुरवठा सुरळीत करा नागरिकांची तेल्हारा पालिका अध्यक्ष मुख्याधिकाऱ्याना मागणी

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा शहरातील सात्काबाद येथील पाणी पुरवठा प्रभावित झाल्याने नागरिकांची पिण्याच्या पान्यासाठी भटकती सुरु झाली आहे तरी भेदभाव न करता सात्काबाद येथील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी तेल्हारा नगर परिषद च्या अध्यक्षा व मुख्याधिकारी यांना आज २९ सप्टेंबरला निवेदन देऊन केली . तेल्हारा शहरा मधे काही भागात पाणी पुरवठा सुरळीत चालू आहे तसेच काहीविशेष प्रभागात सुद्धा पानी पुरवठा सुरळीत चालू आहे परंतु काही भागा मधे मात्र चार पांच दिवसांपासून पाणी पुरवठा पूर्ण पने बंद आहे यावरून नगर पालिके मध्ये भेदभाव सुरु आहे . आमच्या सात्काबाद परिसरात गेल्या चार ते पाच दिवसापासून पाणी येऊ लागले नाही गेल्या अनेक दिवसांपासून पाइप लाइन या भागात जोळल्या गेली नाही त्यामुळे या भागात नागरिक राहत नाहीत काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे पाणी मिळत नसल्यामुळे आम्हाला काम धंधे सोळून दुरवरून पाणी आणावे लागत आहे नगरपालिकेत नागरिकांना पाणी देण्यासाठी भेदभाव होत आहे त्यामुळे आम्हाला पाणी विकत घ्यावे लागत आहे तसेच पाण्यायसाठी आम्हाला भटकती करावी लागत आहे तरी आमच्या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली तसेच मागणी मंजूर न झाल्यास कोणत्याही प्रकारचे आंदोलन करणार व त्याची संपूर्ण जबाबदारी नगर परिषद चि राहणार असा इशारा सुद्धा देण्यात आला .निवेदनावर प्रवीण वैष्णव ,शेख इमरान , हयात खान , शे. नाजिम , शे. अख्तार , गजानन चहाजगुने , शंकरराव भुजबले , रमेश भुजबले , सानिया मिर्जा , रजिया पटेल , शारुख पठान , गजानन मालठानकर , राजेश्वर विखे , फिरोज खाँ , इत्यादी असख्य नागरिकांच्या सह्या आहेत .