ताज्या घडामोडी

कट्यार गावातील जिजाऊ ची लेक कृषीकन्या रणरागिनी ज्योती देशमुख यांचा पं.दिनदयाल उपाध्याय जयंती दिनी पातुर विकास मंच नी केला यथोचित सन्मान

किरण कुमार निमकंडे
संपादकीय सदस्य
अकोला एक्सप्रेस न्युज

अकोला जिल्हयातील कट्यार हे गाव येथील लोकसंख्या जवळपास पंधराशेच्या आसपास येथे राहणा-या श्रीमती ज्योती देशमुख यांचे पती , सासरे व दिर यांनी शेतीसाठी काढलेल्या कर्जाची नापिकीमुळे परत फेड न झाल्याने बॅकेच्या जाचाला आणी सावकारांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी २००६ साली आत्महत्या करून आपल्या जीवनाचा दुर्देवी पणे अंत केला.
यांच्या पश्चात् स्वत:चा लहान मुलगा , भावजय आणी तिची लहान मुलगी या सर्वांची जबाबदारी श्रीमती ज्योतीताई यांच्यावर आली पतीच्या तेरवीला त्यांच्या वडीलांचा ह्रदय विकाराने मृत्यु झाला.त्यांना एक भाऊ तो ही लहानच या सर्वांची जबाबदारी पेलत स्वकर्तुत्वातून कौटुंबिक व सामाजिक दायित्व त्यांनी स्विकारले.
एकदा का स्रीच्या जीवनातून तिचा जीवनसाथी असलेला पुरूष गेला की समाजाच्या त्या स्री कडे बघण्याचा दृष्टिकोण बदलतो. वासनाधीन डोळे नको नको करून सोडतात सर्व नाते संबंध दुरावतात स्वकीय ही अशा वेळी साथ देत नाहीत उलट जास्त प्रमाणात वेडे वाकडे होतात.
यांनाही स्वकियांमुळे मरण यातना सोसाव्या लागल्या..
सासर कडील लोकांनी यांना माहेरी हाकलून लावण्याचा परेपुर प्रयत्न केला….
नेहमी हिन दर्जाची वागणुक दिली..त्यांच्या पतीच्या मृत्यु नंतर उपजीविके करीता लागणारं साहित्य बाहेर जाऊन आणण्यास त्यांना विरोध केला जात होता.
काय तर म्हणे आमच्या घराण्यात महिलांना बाहेर जाण्यास परवानगी नाही पण आपल्या ज्योती ताईने मनाशी प्रणच केला होता की, आता कुणी काहीही हिनऊ दे,अपशब्द बोलू दे आता कुणाचीही मदत न घेता आपला मोडकळीस आलेला अर्धवट संसार पुन्हा उभा करायचा त्याप्रमाणे त्या कामाला लागल्या..घरची वीस एकर शेती ती ही कोरडवाहू शेतीतलं कुठलच ज्ञान नाही वखर , नांगर , तिफण , डवरा , खुरपणी कशी करतात , पेरणी कशी करतात , कुठले बी-बियाणे असतात , कुठल्या कंपनीचे असतात या सर्व गोष्टी पासून कोसो दुर अशी स्थीती..
शिक्षण दहावी नापास असतांना त्यांनी आपल्या मालकिची असलेली शेती करण्यास सुरवात केली..कृषी सेवा केंद्रात जाऊन उसन वारी करून त्यांचे मार्गदर्शनाने कोणते पिक घ्यावे कसे घ्यावे याची माहिती मिळवून बी-बियाणे आणले…
गावातील ट्रॅक्टर वाल्याला जवळ असलेले थोडे फार जवळ असलेले दागीने विकून आलेल्या पैशांपैकी काही रक्कम आगाऊ म्हणून शेत पेरणी साठी दिली…
बी-बियाणं घरी येऊन पडलेलं होतं पण ट्रॅक्टर वाल्याला पैसे आगाऊ देऊन पण तो येत नव्हता….
सर्व गावातील शेतकरी लोकांचे शेत पेरले गेले होते पण हा ट्रॅक्टर वाला या ताईंना पैसे देऊन पण प्रतिसाद देत नव्हता शेवटी त्यांनी दुस-या ट्रॅक्टर वाल्याला बोलावले तो एके दिवशी येतो येतो करत पार रात्री दहा वाजता ताईंच्या शेतात पोहोचला आणी पेरणीला सुरवात झाली त्या दिवशी ताई सकाळ पासुन त्याची वाट बघत होत्या त्यामुळे त्या थकून शेत पेरतांनी काट्याकुट्यातच झोपी गेल्या..रात्री दिड वाजता ट्रॅक्टर वाल्यानी सर्व शेत पेरून झाल्यावर त्यांना झोपेतून उठवले..
काही दिवसांनी पेरलेलं बी-बियाणे उगवण्यास सुरवात झाली परंतु पेरणा-या ट्रॅक्टर ने व्यवस्थीत न पेरल्याने काही ठिकाणी पिक उगवलं काही ठिकाणी उगवलच नाही..याचा जाब त्यांनी त्या पेरणी करणा-याला विचारला परंतु त्यानी उलट यांनाच बरे वाईट बोलून त्यांची अवहेलना केली.. ज्या ठिकाणी पिक उगवलच नाही अशा ठिकाणी हाताने परत पेरले व त्या वर्षीचे पिक घेतले..ताईंच्या मनाला वाटलं जर माझ्या कडे ट्रॅक्टर असते आणी मला चालवता आले असते तर मी चांगल्या प्रकारे माझं शेत पेरले असते दुस-यांच्या भरवशावर अवलंबून राहावं लागलं नसतं हा विचार मनात घर करून होता.. त्यामुळे त्या दुस-या गावात असलेल्या ट्रॅक्टर वर तो चालवण्याचा प्रयत्न करू लागल्या व अल्पावधीतच त्या उत्तम प्रकारे ट्रॅक्टर चालू लागल्या असे काही वर्ष निघून गेले..
त्यांनी हफ्त्याने एक नवीन ट्रॅक्टर विकत घेतले सोबत शेती साठी लागणारे त्याचे सर्व साहित्य पण विकत घेऊन त्या स्वत:ची शेती तांत्रिक पद्धतीचा वापर करून करू लागल्या…दुसरी कडे हे करत असतांना वडिलोपार्जित असलेल्या त्यांच्या दुस-या एका शेतावर त्यांच्या भावकीने ताबा केला होता अशांच्या विरोधात कोर्ट कचेरीशी ही त्या सामना करत होत्या..त्यांनी गावात असलेलं कौलारू पद्धतीचं घर पाडून आता सिमेंट काॅन्क्रीटचे प्रशस्त नवीन घर बांधले आहे….
स्वत:च्या मुलाला व दिराच्या मुलीला उत्तम शिक्षण त्या देऊ लागल्या..त्याना हव्या असलेल्या सर्व बाबींची पुर्तता त्या करू लागल्या होत्या..
मुलाला खामगांव येथे बी ई कंम्पुटरचं शिक्षण व मुलीला अकोला येथे बी एस सी चं शिक्षण देऊन मुलाला आज पुणे सारख्या ठिकाणी चांगल्या कंपणीत नोकरी आहे व मुलीला चांगलं सुशिक्षित बनवलं आहे..
आज त्या दहावी नापास असून अंगणवाडी शिक्षिका आहेत..
गावात बचत गट चालवून महिलांना आपल्या पायावर उभं राहायला शिकवून स्वाभिमानी बनवत आहेत..
ज्या परीस्थीतीचा सामना त्यांनी केला तशी परीस्थीती कुणा वर येऊ नये यासाठी पाहिजे ती मदत आज त्या करीत आहेत..
त्यांच्या दारी आलेला याचक रिकाम्या हाताने आता कधी ही परत जात नाही अशा या काळातील अकोला जिल्ह्यातील कट्यार गावातील या जिजाऊ च्या लेकी ला , आपल्या भगिनीला सन्मानीत करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं यापेक्षा अधिक काय हवं आहे असं प्रामाणिक मत व्यक्त करतांना खरचं डोळ्यांतुन आनंदाश्रू निघत आहे..
यापुर्वी त्यांना अनेक ठिकाणी सन्मानीत करण्याचं आलं आहे..बी.बी.सी.न्यूज मराठी ने त्यांच्यावर प्रकाश झोत टाकण्याचं काम आजच्या कोरोना काळात केलं त्यांच्यामुळे आम्हाला त्यांच्याशी भेटता आले,बोलता आले,त्यांचे आशिर्वाद घेता आले त्याबद्दल बीबीसी चे मा.श्रीकांत भंगाळे यांचे मनःपूर्वक आभार..
अशा रणरागिनी श्रीमती ज्योती देशमुख यांचा पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त साडी चोळी आणी शाल देवून यथोचित सन्मान करतांना
याप्रसंगी पातुर विकास मंचचे ठा.शिवकुमारसिंह बायस जि.प.शिक्षक रीतेश सौदळे , गणेश गाडगे आणी मित्र परीवार

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: