शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच, भाजपा चे पातूर तहसीलवर चुन भाकर आंदोलन

अविनाश पोहरे – संपादक
महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी, पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. कोणत्याही शेतकऱ्यांपर्यंत शासनाची मदत पोहचली नाही. विदर्भातील लाखो शेतकऱ्यांची नावे या मदतीमध्ये आलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी संवाद कार्यक्रमात फराळ करा, रोषणाई करा असे वारंवार म्हटले परंतु आज शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच आहे. ना गोड धोड, ना रोषणाई म्हणून शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी ‘काळी दिवाळी’ आहे.
आज शेतकरी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना दिवाळीच्या पर्वावर चुन भाकर, पिठलं भाकर देऊन काळी दिवाळी साजरी केली. भाजपा व भाजपा किसान मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालयावर 13 नोव्हेंबर २०२० रोजी भाजपा व शेतकऱ्यानी आंदोलन करून, चुन भाकर खाउन आणि तहसीलदार यांनाही चुन भाकर खायला देण्यात आली. या आंदोलनाद्वारे सरकारकडे खालील मागण्या करण्यात आल्या –
१) महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी, सततच्या पाऊस व पुरामुळे झालेल्या शेती व पिकाचे फळबाग झालेल्या नुकसानभरपाई सरसकट दिवाळीपूर्वी कोरडवाहुला 25 हजार व बागायतीला हेक्टरी 50 हजार रुपये प्रमाणे देण्यात यावी. तुटपुंज्या मदतीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नये. कापसाची बोंडअळी बोंडसळी, सोयाबीन, धानाचे झालेले नुकसान, संत्र्यांची फळगळती याकरिता शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी.
२) केंद्राच्या MSP कायद्यान्वये 18 प्रकारच्या भरड धान्याची, कापसाची खरेदी केंद्र मुबलक प्रमाणात सुरु करावीत व दिवाळीतही खरेदी सुरु ठेवावी.
३) यावर्षी शेतकऱ्यांना कर्ज फेडणे अश्यक्य आहे म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसकट करण्यात यावी.
४) हवामानवर आधारित फळ पीक विमा योजनेचे महाराष्ट्र सरकारने बदललेले निकष अन्यायकारक असून फक्त विमा कंपन्याच्या फायद्याचे आहेत. संत्रा, केळी व इतर फळबागांच्या विमाचे बदललेले निकष त्वरित रद्द करून जुने 2018-19 चे निकष कायम करण्यात यावे.
५) किसान क्रेडीट कार्डची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी.
६) सध्या कृषी पंपाचे वितरण मार्च 2018 नंतर संपूर्णत: बंद आहे. ट्रान्सफार्मर जळला तरी नादुरुस्त ट्रान्सफार्मर 24 तासात देऊन दिवसा किमान वीजपुरवठा द्या.
७) रासायनिक खते, बियाणांचा रास्त दरात सुरळीत पुरवठा करा.
८) कृषी यांत्रिकीकरण, सुष्म सिंचन, नानाजी देशमुख कृषी समृद्धी अभियान तातडीने सुरू करण्यात यावे.
या सर्व मागण्यांकरिता भारतीय जनता पार्टी पातूर तालुका व शहराच्या वतीने आंदोलन करण्यात आले ,आंदोलनाचे नेतृत्व श्री रमण जैन , रामभाऊ गोळे यांनी केले ,यावेळी उपस्थित म्हणून विजयसिंह गहिलोत ,भिका धोत्रे ,चंद्रकांत अंधारे ,राजु उगले ,अभिजीत गहिलोत ,रुपाली राऊत ,गजानन निमकाळे ,श्रीकांत बराटे ,विनेश चव्हाण ,दिलीप बगाडे ,द्न्यानेश्वर जाधव ,गजानन शेंडे ,मंगेश केकन ,सचिन बरोकार ,दिलीप डोंगे ,सचिन बायस ,ओमप्रकाश लखाळे ,शंकर जामोदे ,सागर आखरे ,अजय लासुरकर ,सुभाष खिल्लारे ,गजानन भोकरे ,विष्णू शेलारकर ,रमेश राठोड ,अजय गिरी ,महेश वैद्य ,प्रभाकर कवर ,डिगांबर गोतरकर ,निलेश फुलारी ,दिनेश करपे ,महादेव गावंडे ,पांडुरंग राऊत ,भिकाजी काकड ,सतीश ईंगळे ,किरण टप्पे ,रामभाऊ शिंदे ,सुधाकर जवंजाळ ,अविनाश महाजन ,विशाल काळे ,विश्वनाथ टप्पे ,दिलीप गिल्ले ,हिरा वैद्य व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.