मुर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथे जनावरे चोरिला,एकाच दिवशी ४ बैल गेले चोरिला

हरीष गाठेकर
मुर्तिजापूर तालुका प्रतिनिधी
मुर्तिजापूर:- तालुक्यातील लाखपुरी येथे एकाच दिवशी तब्बल चार बैल चोरिला गेल्याची घटना समोर आली आहे,रात्रीच्या १: ३० सुमारास गावातील नागरिकांच्या गोठ्यातुन बैल चोरट्यांनी चोरून नेले असल्याने गावातील शेतकरी दोन शेतकर्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, रामदास बिसन चव्हाण व वासुदेव दौलत घन या दोन शेतकऱ्यांची जोड्या रातो रात लंपास केल्याने या शेतकऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे या जोड्या १,४०,००० रु या दोन बैलजोड्यांची किंमत असल्याचे शेतकरी सांगत आहेत,शेतीने या वर्षी शेतकर्यांला सात तर दिली नाही पण हे चोरटे पण शेतकर्यांच्या बैलजोड्या चोरत आहेत, अज्ञात या चोरांना वेळेवर आळा न घातल्यास त्यांची हिम्मत वाढेल त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी गावातील नागरिकांन कडून होत आहे,सध्या जनावरे चोरिचे प्रमाण वाढल्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे मागील वर्षी सुद्धा गावातील काही खुप मोठ्या प्रमाणात चोरिला गेली आहे, प्रशासन यावर लवकरात लवकर मार्ग काढेल व या जनावरांना शोधून काढेल असे गावातील ग्रामस्थांना वाटत आहे
पुढील तपास लाखपुरी बि.ट.सुभाष जमदार उघडे करित आहेत.