रमाई,शबरी व प्रधानमंत्री घरकुल योजनेचे लाभार्थ्यांना ८ दिवसाच्या आत निधी उपलब्ध करून द्यावा.

प्रहार सेवक अमोल करवते यांची पातूर पंचायत समितीला निवेदनद्वारे मागणी
किरणकुमार निमकंडे / पातूर
पातूर:- आज दि – 10 नोव्हेंबर 2020 रोजी रमाई, शबरी व प्रधानमंत्री घरकुल योजने अंतर्गत ज्या ज्या लाभार्थ्यांना घरकुल मिळाले त्यांचा अर्धा निधी मिळाला असून त्यांचा उर्वरित निधी आठ दिवसाच्या आत देण्यात यावा. उर्वरित राहिलेले घरकुल तात्काळ बांधकाम करून ते लाभार्थी घरामध्ये वास्तव्यास जाऊ शकतील तरी आपण उर्वरित घरकुल निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावा.
लाभार्थी घरकूल योजना घरकुलास पात्र झाले आहे त्यांच्या खात्यात सुद्धा घरकुल बांधण्याकरिता निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच घरकुल योजनेतून घर बांधता येईल व लाभ घेता येईल हा विषय अत्यंत महत्वाचा असून काही लाभार्थ्यांना आज पर्यंत निधी प्राप्त झाला नसून ते लाभधार निधीच्या प्रतीक्षेत असून त्यांचे घर अपूर्ण बांधकाम झाले असून ते आज रोजी उघड्यावर आहेत. तरी या सर्व बाबींचा विचार करून तत्काळ आठ दिवसाच्या आत निधी प्राप्त करून देण्यात यावा असे आव्हान अमोल करवते (प्रहार सेवक) यांनी केले. तसेच पातूर पंचायत समितीचे अधीक्षक उल्हास घुले यांना निवेदनद्वारे मागणी केली आहे यावेळी अमोल करवते (प्रहार सेवक) शुभम उगले,अविनाश पोहरे,पवन तांबे,सुनिल बग्गन संतोष इंगळे,प्रवीण गवई,आदी कार्यकर्ते व घरकुल लाभार्थी उपस्थित होते.