ताज्या घडामोडी

महाराष्ट्र वक्तृत्व परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी अक्षय इळके यांची निवड.

अविनाश पोहरे – संपादक

महाराष्ट्रात वक्तृत्व क्षेत्रातील अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी कार्यक्षम असणाऱ्या वक्तृत्व परिषद महाराष्ट्र राज्याच्या,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी नाईट कॉलेज इचलकरंजी,कोल्हापूरचे अक्षय मारुती इळके यांची निवड करण्यात आली. वक्तृत्व क्षेत्रातील व सामाजिक कार्यातील प्रभावी योगदानाची दखल घेऊन वक्तृत्व परिषदेकडून ही निवड करण्यात आली.परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. शिवराज आनंदकर व निवड समितीने नुकतीच परिषदेची कार्यकारिणी जाहीर केली. इळके यांनी राष्ट्रीय,राज्यस्तरीय तसेच अनेक महाविद्यालयीन वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या नियुक्तीने पश्चिम महाराष्ट्रात वक्तृत्वाचा विकास,प्रसार करण्याचा आणि सामाजिक,शासकीय,राजकीय योजना राबवण्याचा अधिकार इळके यांना प्रदान करण्यात आला. गेल्या काही काळामध्ये समाजमन कोरोना विषाणूमुळे त्रस्त असताना इळके यांनी वक्तृत्वाच्या माध्यमातून वैचारिक प्रबोधन करत तसेच अनेक ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. सोबतच सर्वाधिक स्पर्धा जिंकणाऱ्या स्पर्धकांच्या यादीतही इळके यांची वर्णी लागते. या निवडीबद्दल इळके यांच्यासह कार्यकारिणीचे ही सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदन होत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: