ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका अक्षय राऊत यांची अमरावती विद्यापीठाला विनंती

अविनाश एस. पोहरे – संपादक

अमरावती विद्यापीठ सलग तीन-चार वेळा वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांची मानसिक ओढाताण झाल्याचे वास्तव चित्र आपल्याला पाहायला मिळत असतांना. पुन्हा विद्यापीठाने विद्यार्थ्यांना छळायला सुरुवात केली.आज पासून सुरू झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये online पध्दत वापरण्यात आली त्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांचे ID login होत नसल्याची बाब समोर आली, सकाळी 10 वाजता सुरू होणाऱ्या पेपर ची वेळ संपत आली तरी देखील विद्यार्थी त्यावर login होऊ शकले नाही, काहींचे login झाले परंतु exam start होत नव्हती, काही विद्यार्थ्यांची exam start झाली तर त्यांच्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका न मिळता biochemistry च्या विद्यार्थ्यांना electronics चा पेपर मिळाला. मग प्रश्न असा की विद्यार्थ्यांनी कसा पेपर सोडवावा.
बऱ्याच विद्यार्थ्यांना सलग 7 प्रश्न सारखे आले. काही विद्यार्थ्यांनी पाचव्या सेमिस्टर ची परीक्षा देत असताना त्यांना सहाव्या सेमिस्टर ची प्रश्नपत्रिका देण्यात आली. नेमकं विद्यार्थ्यांनी करावं काय? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभे झाले आहेत.मग अशा वेळेला उपस्थित झालेल्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विद्यापीठाने help line नंबर दिला परंतु विद्यार्थ्यांनी कॉल केला असता help line नंबर कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आणि जेव्हा मिळाला तेव्हा उडवा उडवीची उत्तरे विद्यापीठाकडून देण्यात आली.
20 ऑक्टोबर ला परीक्षा देणारे विद्यार्थी परीक्षे पासून वंचित राहिलेले पाहायला मिळत आहेत. यावर योग्य तो उपाय विद्यापीठाने काढावा. अन्यथा आम्ही टोकाची भूमिका घेऊ असे मत विद्यार्थी प्रतिनिधी अक्षय राऊत यांनी व्यक्त केले.

हेमंत देशमुख यांच्याशी चर्चा केली असता दिवसभरात केव्हाही परीक्षा देता येणार व आज जे विद्यार्थी परीक्षा देऊशकले नाही त्यांच्यासाठी लवकरच सकारात्मक पाऊल टाकू असे सांगण्यात आले.

हेमंत देशमुख (संचालक परिक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती)

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: