मन नदीवरील पुल देत आहे धोक्याची घंटा .
शेषराव बेलुरकर
प्रतीनीधी कवठा
शेगाव ,अकोट महामार्गावरील लोहारा येथील मन नदीवरील पुल खिळखीळ स्वरूपाचा झाला आहे मात्र या कडे बांधकाम वीभागाच दुर्लक्ष झाल्याच चीत्र दीसत आहे
याचे कारण असे की या पुलावरती मोठ मोठे खडडे पडले आहे काही दीवसापुर्वी तुडपुंजी दुरूस्ती केली होती पंरतु पुढे या नदीवरील असलेले कवठा बॅरेज असल्यामुळे पावसाळयात हा पुल नेहमी पाण्याखाली राहत असल्यामुळे हा पुल पुर्णपणे शीकस्त झाला तसेच या पुलावरती सरक्षण कठडे सुध्दा नाही आहेत तसेच या महामार्गावर नेहमी वर्दळ राहते तसेच ओव्हर लोड वाहने भरपुर प्रमाणात धावततात त्यामुळे सुध्दा गंभीर स्वरूपाचे खड्डे झाले आहेत यामध्ये बर्याच वेळा दुचाकी स्वार पडुन कीरकोळ जखमी झाले आहेत तरी सुध्दा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे हीच परीस्तीथी राहली तर या पुलावर फार मोठी जीवीत हानी होईल एवढे मात्र नीश्चीत, तरी तात्काळ पुलावरील वरील दुरूस्ती करूण व पुलावरती कठडे बसवण्यात यावे अशी मागणी स्थानीक नागरीक व नीयमीत ये जा करणारे प्रवाशी करीत आहेत.











