ताज्या घडामोडी

बीओटी तत्त्वावरील कोल्हापूर ते सांगली रस्ता चौपदरीकरणाच्या कामास गती देण्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

मुंबई, दि. 16 : खाजगीकरणांतर्गत बांधा-वापरा हस्तांतरित करावयाच्या तत्त्वावर करण्यात येणारे कोल्हापूर (शिरोली) ते सागंली रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास गती द्यावी. शासनाची मान्यता घेऊन संबंधित रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यासाठी धोरण ठरविण्यात यावे, असे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

बीओटी तत्त्वावर कोल्हापूर (शिरोली) ते सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणासंदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. या बैठकीत सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे एस साळुंखे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प व्यवस्थापक पंदरकर, अधीक्षक अभियंता एस.माने, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे कार्यकारी व्यवस्थापक एम. के. वाठोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव प्रज्ञा वाळके आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नुकत्याच शासनाच्या निर्णयानुसार संबंधित रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाला असल्याने हे काम केंद्र शासनास हस्तांतरित करण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्ग काँक्रीटीकरणाचे व सुधारण्याची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.

संबंधित पुढील रस्त्याच्या चौपदरीकरणासंदर्भातील कामासाठी शासनाची तातडीने मान्यता घेऊन धोरण ठरवून या कामास गती द्यावी, असे राज्यमंत्री श्री.भरणे यांनी सांगितले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: