बाळापूर तालूक्यातील शेतकर्यांना करावी लागेल दिवाळी अंधारात साजरी

अंकित क-हे
ग्रामीण प्रतिनिधी/ नया अंदुरा
अंदुरा निंबा सर्कल मधील ग्राम नया अंदूरा, कारंजा (रम), अंदूरा, हाता, हातरूण, शिंगोली, कवठा, बहादूरा, निंबा मोखा वझेगाव, काझिखेड, लोहारा,अंत्री मलकापूर, उरळ,मोरगाव सादीजन, गावासह अनेक गावातील शेतकऱ्यांना दिवाळी करावी लागणार अंधारात साजरी शेतकऱ्यांनच्या समोर विविध प्रश्न उपस्थित आर्थिक पेच सुटनार कसा.बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अनेक योजनेचा लाभ मिळाला नसल्याने येणारा दिवाळी सन हा शेतकऱ्यांना अंधारात करावा लागणार आहे ते पुढील प्रमाणे प्रकाशित करण्यात आली आहे (१) शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ नाही(२) बोंडअळी मदत नाही (३) दुष्काळ मदत नाही (४) मागील वर्षाचा पीक विमा नाही (५) पिएम किसान योजनेचा लाभ नाही अशाच प्रकारे बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनच्या पीकाचे नुकसान ते पुढील प्रमाणे प्रकाशित केले आहे शेतकर्यांचे पीके मुंग, उळीद, सोयाबीन, ज्वारी, कपाशी, तुर, अशा प्रकारे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकर्यांना अद्यापही शेतकर्यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत जाहीर केले नाही व शेतकर्यांना भेटली नाही तरी शासनाने तातडीने दिवाळीच्या आगोदर शेतकर्यांना देण्यात यावे अन्यथा शेतकर्यांना दिवाळी सन अंधारात साजरी करावी लागणार आहे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा निंबा येथील अधिकार्यांनी शेतकर्यांना कुठल्याही प्रकारची संमती न घेता पुनरर्गठन केल्याने निंबा परिसरातील शेतकर्यांना आर्थिक पेच पडला आहे त्या शेतकर्यांना जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या वरीष्ठ अधिकारी यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून त्या शेतकर्यांना कर्ज माफी योजनेच्या माध्यमातून बाहेर काढावे निंबा येथील जिल्हा मध्यवर्ती बँक यांनी जवळपास जास्तीत जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत त्यांना कर्ज माफी योजनेच्या घोटाळ्यात अडकवले आहे व बाकी शेतकर्यांना कर्ज माफी योजनेचा लाभ दिला जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा निंबा येथील अधिकारी यांनी अल्पभूधारक शेतकर्यांचा विश्वास घात केला आहे असा आरोप शेतकर्यांनी केला आहे .परतीच्या पावसाने सुरूवातीला शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक मुसळधार पावसाने हिसकावुन घेतले होते त्यामुळे मुंग, उळीद, पीकाचे नुकसान केले होते नंतर सोयाबीन,तुर, कपाशी, पीकाचे अतोनात नुकसान होते आहे तरी शासन सुस्त कृषी अधिकारी मस्त शेतकरी त्रस्त झाले आहे तरी कृषी अधिकारी यांनी शेतकर्यांना अध्यापही सुचना व माहिती दिली नाही आहे .नया अंदुरा परिसरात शंभर टक्के बोंडअळी आलेली आहे तरी कृषी अधिकारी यांनी कृषी साह्यक यांना आदेश जाहीर करून शेतकर्यांना माहिती पोहचविण्याचे काम करण्याचे आदेश दिले आहेत परंतु कृषी साह्यक यांनी गावात भेट देण्याच्या एक दिवस अगोदर कृषी मित्र यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता व कृषी मित्र यांना अनुदान असतांना त्यांना शेतकर्यांना माहिती देण्यासाठी न सांगता अनाधिकृत माणसाला शेतकर्यांना माहिती देण्याचे काम करतात त्यांनी ते काम केले नाही तर त्यांना समाधान कारक उत्तरे देत नाहीत म्हणून नया अंदुरा गावातील कृषी साह्यक यांची बदली करावी अन्यथा कृषी मित्र बदलावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.नया अंदुरा गावातील शेतकरी
(१) नया अंदुरा परिसरात सुरूवातीला मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नया अंदुरा परिसरातील पीकांचे नुकसान झाले आहे ते म्हणजे मुंग,उळीद, सोयाबीन, ज्वारी, कपाशी,तुर, या पीकाचे अतोनात नुकसान झाले आहे तरी शासनाने तातडीने मदत द्यावी अशी मागणी नया अंदुरा परिसरातील शेतकरी करीत आहेत: शेतकरी सत्यम झाडे (नया अंदुरा) (२) माझ्या कडे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा निंबा येथील बँकेत 35.000 हजार रुपये खर्च असल्या नंतर मला बँक शाखेतील अधिकारी यांनी माझी कुठल्याही प्रकारची संमती घेतली नसलेल्या नंतर सुध्दा पुनरर्गठन केल्याने माझे12.500 हजार रुपये माफ केले आहे मला माझे सर्व कर्ज माफ करावे ही अपेक्षा करतो शेतकरी : भास्कर क-हे(नया अंदुरा) तरी जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा निंबा येथील वरीष्ठ अधिकारी यांनी तातडीने जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा निंबा येथील खातेदारांचे कर्ज पुनरर्गठन मधून माफ करून त्यांना नवीन कर्ज माफ करावे अशी मागणी निंबा परिसरातील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेचे खातेदारांचे म्हणने आहे